समाजात वावरत असतांना बऱ्याच अंशी लोकांना आणि समाजातील विचारवंतांना सतावत असणारा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारा असा एक विषय हा ‘धम्म आणि धर्म’ याचासारखा मला येथे मांडावासा वाटतो. ज्याप्रमाणे धम्म आणि धर्म या दोन गोष्टी समाजातील घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचेआणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत समाज मध्यमांना यातील भेद हा समजणे जसे आवश्यक आहे त्याच प्रमाणे, समाजातील लोकांना ‘बुद्ध आणि बौद्ध’ ह्या दोन गोष्टी सुद्धा समजणे अत्यंत आवश्यक आहे.
समाजातील अनेक लोक, सुशिक्षित पुढारलेले पुढारी, समाजसेवक, विचारवंत, वक्ते, हे ‘बुद्ध आणि बौद्ध’ या दोन भिन्न असलेल्या गोष्टींमध्ये साम्यता आहे असे मानतात. वास्तवात तसे नाही. ‘बुद्ध आणि बौद्ध’ यात बराच फरक आहे. जरी या दोघामध्ये फरक असला तरी ते एका सूक्ष्म अशा धाग्याने बांधलेले आहे.
प्रथम बुद्ध म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधने आगत्याचे आहे. ‘बुद्ध’ हे भाषाशास्त्रानुसार एक विशेषण आहे. आणि विशेषण म्हणजे, एखादा प्राणी, पक्षी, वनस्पती, किव्वा वातावरणातील निर्जीव घटक याविषयी विशेष माहिती सांगणारा किव्वा दर्शवणारा शब्द म्हणजे विशेषण अशी सर्वसामान्य व्याख्या विशेषणाची करता येईल. यावरून असे कळते की बुद्ध हे एका व्यक्तीसाठी वापरले गेलेले विशेषण आहे. थोडक्यात येथे असे म्हणता येईल की बुद्ध म्हणजे असा व्यक्ती की ज्याला सम्यक, संबोधी प्राप्त झालेली आहे. बुद्ध हा शब्द समजण्यासाठी येथे ‘सम्यक’ आणि ‘संबोधी’ हे शब्द सुद्धा समजणे अत्यावश्यक आहे. येथे आधी आपण ‘सम्यक‘ या शब्द्दाचा अर्थ जाणून घेवूया:
‘सम्यक’ या शब्दाचा अर्थ सर्वसामान्यपणे ‘संपूर्ण, ‘वास्तविक’ ‘सत्य’, ‘अतुलनीय’, ‘योग्य’ हे होत. संपूर्ण: जो पूर्ण आहे, समाजातील संपूर्ण माहिती ज्याला आहे, ज्यात काहीही कमतरता नाही असा व्यक्ती होय. वास्तविक: जो वास्तव जीवनातील सर्व जाणतो, जो न भविष्यात ना भूतकाळात राहतो जो फक्त आणि फक्त वर्तमानात वास्तव्य करतो. जो वास्तविक तत्वप्रणाली समाजाला सांगतो असा व्यक्ती. सत्य: जो नेहमी सत्य वचनांचा आणि वाचेचा जीवन जगतांना अवलंब करतो. नेहमी सत्य वागतो आणि सत्यच बोलतो, जो नेहमी सत्य दृष्टी किंवा विचार दर्शवतो. नेहमी सत्याच्याच बाजूने उभा राहतो असा व्यक्ती. अतुलनीय: म्हणजे ज्याची समाजातील कोनासोबतही तुलना करता येत नाही असा व्यक्ती. योग्य: जो नेहमी चांगले वर्तन करतो, समाजातील ज्याची वागणूक योग्य व सदोचीत आहे असा व्यक्ती. म्हणजेच सम्यक व्यक्ती होय.
भगवान बुद्धाने सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक स शब्द आलेला आपणास दिसतो ज्यात “सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी” आहेत. म्हणजेच योग्य.
आता आपण ‘संबोधी‘ या शब्द्दाचा अर्थ जाणून घेवूया:
संबोधी हा शब्द समजून घ्यायला खूपच सोपा आणि सरळ आहे. याचा शब्दशः अर्थ परिपूर्ण असा घेता येईल. म्हणजे ज्याला समाजातील परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा व्यक्ती. ज्याला संपूर्ण आणि सखोल, अमर्याद असे ज्ञान आहे असा ज्ञानी व्यक्ती होय.
वरील विवेचनावरून आपणास असे स्पष्ट संगता येईल कि, बुद्ध म्हणजे असा व्यक्ती कि ज्याला सम्यक म्हणजे ‘संपूर्ण, ‘वास्तविक’ ‘सत्य’, ‘अतुलनीय’, ‘योग्य’ आणि संबोधी म्हणजे परिपूर्ण, अमर्याद, सखोल ज्ञान प्राप्त झाला आहे असा व्यक्ती.
बुद्ध हे व्यक्तीचे नाव नाही. बुद्ध हे व्यक्तीच्या मानसिक स्थितीचे वर्णन आहे. हे व्यक्तीच्या मनाचे आणि अवस्थेचे नाव आहे. बुद्ध ही मनाची आशी अवस्था आहे की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे. बुद्ध ही बोधिसत्वा नंतर निर्माण होणारी मनाची अवस्था आहे. मनुष्य बुद्ध होण्यापूर्वी ज्ञान मिळवण्याच्या मार्गावर आरूढ असतो. बोधिसत्त्व हा आपल्या जीवन आवस्थेत क्रमशः प्रगती करीत असतो. पुढे जावून तो ‘दस पारमिता ‘ यांचा परिपूर्ण अभ्यास करतो. ‘मुदिता (आनंद)‘, ‘विमलता (शुद्धता)‘, ‘प्रभाकारी (तेजस्विता)‘, ‘अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता)‘, ‘सुदुर्जया (जिंकण्यास कठीण)‘, ‘अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती आणि तिच्या कारणांची निदाने जाणणारा (हि एकूण बारा निदाने आहेत.))‘, ‘दुर्ड्गमा (दूर जाणे)‘, ‘अचल (अढळ)‘, ‘साधुमती (धम्माच्या सर्व दिशा जाणने)‘ आणि ‘धम्ममेध‘.
असा परिपूर्ण ज्ञान प्राप्त ज्ञानी व्यक्ती म्हणजेच बुद्ध होय.
मला वाटते बुद्ध म्हणजे काय? हे आपणास कळलेले असावे आता प्रश्न असा आहे की, बौद्ध म्हणजे काय?
आपणास माहितच आहे की, भगवान गौतम बुद्ध हे ज्ञान प्राप्त करून थांबले नाहीत तर त्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून जगाला आजच्या विध्वंसक अशा परिस्थितीत तारणारा धम्म दिला. येथे धम्म दिला म्हणजे एखादी वस्तू दिली असे नव्हे. जगातील संघर्ष, दु:ख नाहीसे करण्यासाठीचा मार्ग, शिलाचरण याचा उपदेश दिला. आणि या उपदेशालाच धम्म असे नाव पडले. आणि हा उपदेश भगवान बुद्धाने दिला म्हणून त्याला बुद्धाचा धम्म. म्हणजे बौद्ध धम्म असे नाव देण्यात आले.
आणि जो व्यक्ती किव्वा गट बुद्ध म्हणजे ज्ञानी, धम्म म्हणजे योग्य आचरण आणि संघ म्हणजे चांगल्या कामासाठी एकत्र आलेला समूह. या सर्वांना शरण गेला आहे असा व्यक्ती याला बौद्ध म्हणतात. भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेसानुसार जो वागतो त्याला बौद्ध म्हणतात. म्हणजेच असा व्यक्ती जो पूर्णपणे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार मार्गक्रमण करतो, त्यानुसार समाजात आचरण करतो तो बौद्ध होय. जो व्रत-वैकल्प, कर्मकांड, पूजा-पाठ, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, अंधश्रद्धा, प्रार्थना, अर्चना व आराधना यांना थारा न देता, बौद्ध धम्मातील सदाचार, पंचशील, मानवता, आर्य अष्टांगिक मार्ग, दस पारमिता यांचे पालन करतो तो बौद्ध होय. परंतु आज कायद्यानुसार बौद्ध मातापित्यांच्या आपत्यांना आणि बौद्ध धम्मदीक्षा घेतलेल्या व्यक्तीला आपण बौद्ध म्हणतो.
हा फरक खऱ्या अर्थाने समाजाला कळणे आवश्यक आहे.
(विलास वसंत रायमळे)
(मोब. ९६५७१५२५८५