तथागत भगवान बुद्ध यांनी धम्म सिद्धांत आपल्या उपासकांना आणि संघास अत्यंत सोयीस्कर आणि सोप्या भाषेत सांगितलेला आहे.
या जगातील सर्व वस्तू कारणांमुळे उद्भवतात. कोणतीही गोष्ट स्वयंभू नाही. म्हणजेच या जगक़्तिल सर्व उपलब्ध गोष्टी या कोणत्यातरी कारणाने निर्माण झालेल्या आहेत. जगातील प्रत्येक उपलब्ध गोष्ट किंवा घटना यांच्यासाठी काहीतरी कारणीभूत अस तत्व आहे आणि त्यामुळेच या येथे आपणास निर्मिलेल्याया दिसतात. या जगात स्वयंभू अस काही नाही. सर्व निर्मित गोष्टींसाठी काहीतरी कारण आहे. कार्ब्नाशिवाय या जगात काहीही घडत नाही.
या जगात निर्माण सर्वच वस्तू परिवर्तनशील आहेत. म्हणजेच कोणतीही वस्तू किंवा गोष्ट हि नित्य (Permanent) नाही. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीत बदल हा आवश्यक आहे आणि तो नेहमीच घडत आसतो.
कर्म सिद्धांतावर आपल्या जीवनातील सुख किंवा दु:ख हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून आपले जीवन आपल्याला सुखी करता येते.
बौद्ध धम्म सिद्धांताचे/ तत्वज्ञानाचे तीन आधार स्तंभ आहेत.
१. अनित्य: परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे प्रत्येक जन्माला आले.ए किंवा निर्माण झालेली गोष्ट हि अनित्य आहे कायम स्थिर नाही. ती कधी न कधी नष्ट होणार आहे. आज आपण जे काही बघत आहोत ते सर्व नष्ट होणार आहे. जीवन आणि जीवनातील प्रत्येक वस्तू हि क्षणभंगुर आहे त्यात बदल हा होणारच आहे. मी, माझे असा अहंभाव बाळगणे योग्य नाही.
२. अनात्म: या जगात आत्म्याचे अस्तित्व नाही. आपण सर्व सामान्य रित्या अस म्हणतो कि या सृष्टीतील सजीवामध्ये आत्मा असतो. या जगात आत्मा नाही. समजा आन मानवामध्ये आत्मा असतो असे गृहीत धरू. तर इथे मानव एक म्हणजे आत्मा पण एकच असणार. मग म्हणजे मानावाच्ग्या मृत्युनंतर आत्मा निघून जाणार. म्हणजेच शरीरातील आत्मा गेला कि मानव नाही मानव मृत आहे असे आपण समजतो. मग इथे विज्ञान आता समोर आणू. आप[नास माहितच आहे कि विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे कि मानाचाच्या मृत्युनंतर त्याचे अवयव विशाष्ट वेळेपर्यंत जिवंत असतात. उदा. मृत्युनंतर २४ तासांपर्यंत आपले डोळे जिवंत आसतात. मानवी मृत्युनंतर त्याचे हृदय सहा तासांपर्यंत जिवंत असते. किडनी ७२ तास आणि यकृत १२ तासांपर्यंत जिवंत असते. मृत्युनंतर मानवी त्वचा आणि हाडे पाच वर्षा पर्यंत जिवंत असतात(डोनेट लाइफ या संस्थेच्या वेबसाईट वरून). इथे आपण आत्म्याच अस्तित्व मान्य केले तर असे दिसते कि आपल्या किंवा सजीवाच्या शरीरात एक नाही तर अनेक आत्मे अस्तित्वात असतात. म्हणजे आत्मा नही.
३. दु:ख: दुख जगात उपलब्ध आहे. आणि ती एक मानवी संकल्पना आहे.
असा हा बौद्ध धम्म सिद्धांत आणि त्याचा आधार स्तंभ आपणास थोडक्यात स्पष्ट करता येईल.
विलास वसंत रायमळे.
मोब. न. ९६५७१५२५८५.